शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

नगर परिषद निवडणुकीतील अनुभव

नगरपरिषद निवडणुकीची ड्यूटी मुस्लिम धर्मीय मोठ्या प्रमाणात असणाऱ्या वाडॉत लागली होती...सहकारी असलेल्या दूसर्या मास्तरीनं बाईनी "तिथं सगळी त्यांचीचं लोक असतात" असा सूर आळवत आपली नाराजी अगोदरचं व्यक्त केली...

निवडणुक अधिकारी म्हणून काम पाहण्याचा ही माझी पहीलीच वेळ त्यामुळे उत्सुकता आणि भिती अशी संमिश्र मानसिक स्थिती होती...
*मुळात कोणतेही काम करत असताना त्या बाबतीत दूषित पूर्वग्रह न ठेवता काम करायची सवय असल्याने येथेही मला त्याची मदतच झाली..*

बुरखा घातलेल्या अनेक महिला आपल्या मतदानाचा हक्क बजावायला येत होत्या...आता ओळख पटवून घेण्या साठी आम्हाला तो बुरखा बाजूला घ्या असं म्हटल्याशिवाय गत्यतर नव्हतं. आधीच मुळातच प्रचंड अशी धार्मिक कट्टरता घेवुन आयुष्य कंठणार्या या महिला वर्गाला एका बाह्य पुरुषाने तेही परधर्मीय व्यक्तीने असं हे धर्मभ्रष्ट (?) क्रूत्य करायला सांगणे तसं जिकिरीचेचं काम पण मला येथे सांगताना आनंद होतोय की या ओळख पटवन्यासाठीच्या कार्यात त्या सर्वच स्त्रीयांनी सहकार्य केले...बूर्खा घालून आलेल्यां पैकी काही स्त्रियाँ स्वतः मतदान केंद्रात आल्यावर बुरखा डोक्यावर घेत होत्या तर काही स्त्रियांना तिथे उपस्थित उमेदवारांचे प्रतिनिधि बुरखा बाजूला करण्यास सांगत होते...व त्या निसंकोच बूर्खा बाजूला सारत होत्या...
थोडक्यात काय तर
*जी राज्यघटना ईथल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचे पालन करण्याचा हक्क देते तीच घटना जेंव्हा मतदानासारखे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याची वेळ येते तेंव्हा धार्मिक बाबींना घरातचं ठेवा असा ईशारा देवून माणूस म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा असा संदेशहि देते...*

याच प्रसंगी मतदान प्रक्रियेविषयी असणारी सामान्य व्यक्तींची निरक्षरताहि मला जवळून पहायला मिळाली...
*स्वातंत्र्याची 65 वर्षे घसरुनहि ईथे कोणत्याचं ईयत्तेत मतदान कसं करायचं असतं या प्रक्रियेविषयी शिकवलं जात नाही हि जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाची शोकांतिकाचं आहे...*

असं असूनही आपल्या मतदानाच्या हक्काची जाणीव असणारे तर काही आपण मतदान नाही केले तर आपल्या नावावर ज्या सरकारी योजना सुरू आहेत त्या बंद होतील या भीतीने तर काही लोक थोड्याश्या पैश्यासाठी विकले गेलेले असा संमिश्र जनसमूह मतदान प्रक्रिया पार पाडताना दिसून आला..
बाकी सद्रुढ लोकशाही निर्मितीसाठी मतदारांची साक्षरता हा मुद्दा आमच्या शिक्षण व्यवस्थे चालवणार्याच्या  जेंव्हा लक्षात येईल तो दिन सोनियाचा !

- *हर्षल जाधव*
9637351400
दिनांक :- 2 डिसेंबर 2016

Posted on by हर्षल जाधव | No comments

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०१६

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

गुलाबी नोटेचे स्वप्न पाहत बँके बाहेरच उभी असलेली एक अडाणी आजीबाई..

"एवढी गर्दी कमी येवू देत मग मग मला पैसे मिळतील" असा समज करून ती बाहेरच उभी होती...सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत होत्या...रांग हनुमानाच्या शेपटी सारखी वाढतच होती...
न राहवून मीच तिची चौकशी केली..तिला तिच्या खात्यातील पैसे काढायचे होते पण बँकेतील गर्दी पाहून तीला काय करायचं उमजत नव्हत..शेवटी मीच तिला पैसे काढायची स्लिप भरून दिली आणि महिलांसाठीच्या रांगेत उभे राहायला सांगितलं...

महिलांची रांग छोटी होती..माझ्या अगोदर पैसे घेवुन ती मोकळी पण झाली...दरवाजाकडे जावु लागली..बँकेतून बाहेर पडते तोच तिच्या काहीतरी लक्षात आलं...मागं फिरली..रांगेत मी अजून उभाच होतो..माझ्या जवळ आली आणि मोठ्या समाधानाने "येतो पोरा " म्हणत निघून गेली...

टीव्ही वर नुसत्या शहरातील बँकेत जमणार्या गर्दीचं चित्रीकरण दाखवलं जातंय..आमच्या खेड्यातील या अडाणी म्हातारा- म्हातारिंची स्वः कष्टातून जमवलेल्या पैस्यासाठीची धडपड कोणालाच कशी दिसत नाही...!

काळाच्या पटलावरील एक एक दिवसांनी पुसट होत जाणाऱ्या या ठिपक्यांनी बँकेचे व्यवहार अचूक पार पाडावेत हि अपेक्षाच मुळात चुकीची आहे पण आशाळभूत नजरेने त्यांनी आमच्या सारख्या एखाद्या तरुण तुर्काची मदत मागावी आणि आम्ही ती करू नये हे मात्र चुकीचं आहे...

बँकेत येवूनहि बँकेत न आलेल्या अनेक वृध्द लोकांना आज आपल्या सारख्या शिकलेल्या तरुणांची गरज आहे....मी मदत केली तुम्हीही करा..
- हर्षल जाधव
दिनांक :- 12 नोव्हेंबर 2016

Posted on by हर्षल जाधव | No comments

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०१६

यावर्षी ची दिवाळी..

यावर्षी ची दिवाळी खूप खास होती..
नोकरीचा पहिला पगार असल्याने दिवाळीत दिवाळी होती.
परंपरे नुसार पहिल्या पगारात घरातील सर्व मेंबर ना कपड़े घेतले...तर कांहींना गिफ्ट..

व यावेळी सर्वात मोठी दिवाळी भेट म्हणजे आमचे ऊर्जा केंद्र,विषमतेचे निर्मूलन करून समतेची विचारधारा बळकट करण्याचे काम ज्यांच्या लेखणीतून आणि विचारांतून नेहमी होत असते असे आ.ह साळूखे सरांची भेट...

यापूर्वी सर आणि मी विविध कार्यक्रमात अनेकदा भेटलो आहोत पण हि भेट काही औरच होती..'लोकायत' मध्ये झालेल्या या भेटीत त्यांच्याशी बोलताना कधी वेळ पुढे सरकला कळले देखील नाही..चळवळ,त्यातून भेटणारी लोकं,वैयक्तिक आयुष्य,लिहिण्याची कला,आपले आरोग्य, त्याच्या सवयी यांसारख्या विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली..वेळ पाळण्याविषयी सर बोलत असतानाच आमच्या हि लक्षात आले की आपण हि आता वेळ पाळून येथून निघायला हवे..शेवटी त्यांना त्यांचे अपूर्ण राहिलेले पुस्तक असुरायन पूर्ण करण्याची विनंती केली व आम्ही निघालो..
दरवर्षी प्रमाणे यावर्षीहि मी दिवाळी च्या दिवशी आमच्या घराच्या अंगणात रांगोळी काढली..वर्षातील काही महत्वाच्या दिवशी मी हि संधी सोडत नाही...ती सर्वांना आवडली..
यंदाहि थोड्या बहुत फरकाने फटाकेमुक्त दिवाळी(100% म्हणता येत नाही) साजरी करत असताना शिल्लक पैश्यातून खूप सारी पुस्तके घेतली...
व पुरोगामी वाचन चळवळ, कोल्हापूरचे वतीने दिनांक 1 नोव्हेंबर ला जिल्हा परिषद मराठी शाळा कोनवडे तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर येथे वैज्ञानिक जाणीव जागृती आणि व्यक्तीमत्वविकास शिबिराचे उद्घाटन झाले. ..
यावेळी पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमा अंतर्गत मी व Rajvaibhav दोघांनि अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांला अनुसरून मांडणी करत असताना विविध चमत्कार सादर केले व त्याचे योग्य स्पष्टीकरणहि दिले..
प्रेक्षण वर्ग 1 ली ते 7 वीचे विद्यार्थी असल्याने त्यांना त्यांच्या पातळीवर जावून प्रबोधनाचे डोस देने तसे अवघडच पण शक्य होईल त्या पदध्तीने विविध मार्गांचा वापर करून कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला...सर्वच मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला...
अश्या प्रकारे यंदाची दिवाळी या विविध उपक्रमानी colourful ठरली....

Posted on by हर्षल जाधव | No comments

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

आपल्या गावात दारू बंदी झाली पण !

आपल्या गावात दारू बंदी झाली पण...!

- हर्षल जाधव कसबा तारळे 9637351400

प्रथमता आपल्या गावातील सर्वच सूज्ञ गावकर्याचे व त्यांनाच सोबत घेवुन गावात दारू बंदी लागू करणार्या ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन....

आपल्या राज्यातील सर्वात जास्त दारू बंदी असणारे गावे ही आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत आणि याच गावांपैकी आपलं एक गाव आहे आणि त्या गावचा मी ग्रामस्थ असल्याचा मला खूप अभिमान ही आहे..

2003 साली आपल्या गावात प्रथमता दारू बंदी साठी मतदान घेण्यात आले होते मात्र येथल्या स्त्री वर्गात असलेल्या जागरुकतेचा अभाव यामुळे ही चळवळ बारगळली..मात्र आज तो सोनीयाचा दिवस उगवला व सामान्य जनमानसाच्या सोबतीला ईथली राजकीय शक्ति  एकवटली व हा निर्णय पार पडला...
आपल्या गावात अनेकदा दारू पिवुन बायकोला मारणारा दारूडा नवरा..अर्वाच शिव्या हसडनारा बाप..किंवा दारू पिवून भावालाच मारणारा भाऊ आपण प्रत्येकाने थोड्या बहूत फरकाने अनुभवलाच आहे...अनेक भगिनींचा संसार या दारूमुळे उध्वस्त होताना आपण पाहिलंय..
या सर्वानाच आता चाप बसणार आहे..

शेवटी समाज हा परिवर्तनशील असतो याचेच हे द्योतक म्हणावे लागेल पण हा विजय साजरा करत असतानाच त्या विजया सोबत काही आपल्याही  जबाबदारी येतात हे लक्षात घ्या..
दारूबंदी हवीच. ती यापूर्वीच आपल्या गावात व्हायला हवी होती असो देर आये दूरूस्त आये..
दारूबंदीमुळे दारू सहजी उपलब्ध होत नाही आणि निदान काही लोक तरी कायद्याच्या भीतीपोटी तिच्यापासून दूर राहतात. या सगळ्या गोष्टी खर्‍या आहेत. परंतु महाराष्ट्रात वर्धा गडचिरोली आणि चंद्रपूर या तीन जिल्ह्यात दारूबंदी आहे,
ती खरोखर लागू आहे का याची पाहणी झाली पाहिजे. कारण दारूबंदी करायची असेल तर ती पूर्ण देशभर केली पाहिजे. एका विशिष्ट राज्यात आणि एका विशिष्ट जिल्ह्यात गावातच केली तर ती करून न केल्यासारखी होते.
हेच पहा ना महाराष्ट्रातच गुटखा बंदी आहे परंतु महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांमध्ये ती बंदी नाही. त्यामुळे त्या राज्यातून महाराष्ट्रात सर्रास गुटखा आणला जातो आणि त्यामुळे महाराष्ट्रातली गुटखा बंदी हा चेष्टेचा विषय झाला आहे.

दारूचे तसेच आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे पण भंडारा जिल्ह्यात नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातले शेवटचे गाव ओलांडून जाऊन भंडार्‍यात दारू प्यायला बरेच लोक गर्दी करतात आणि भंडार्‍यात दारू पिऊन चंद्रपुरात येतात. १९९५ साली आंध्र प्रदेशामध्ये अशीच दारूबंदी लागू करण्यात आली होती. ती दारूबंदी अशा सीमेमुळेच निरर्थक ठरली.
आपल्या गावाचे तसे नको व्हायला..

मुळात दारू बंदी करने हा या समस्येवरील खरा उपाय नाही तर दारूमुक्त समाज निर्माण करने हा आपल्या समोरील सर्वात मोठा संघर्ष आहे तो आपण येणाऱ्या काळात यशस्वी करायलाच हवा कारण दारू बंदी केल्याने आपल्या गावात दारू मिळायची बंद होईल पण जवळच्या ईतर गावात सहज उपलब्ध होणाऱ्या दारूचे काय?
आपल्या गावात ज्या प्रकारे ही दारू बंदी घडून आली तशीच आपल्या आजुबाजुला असणाऱ्या लहान गावांत ही व्हायला हवी यांसाठी प्रबोधनाचा मार्ग आपल्या गावातील तरुण मंडळानी स्वीकारायला हवा..त्याच सोबत आपल्या गावाचा आदर्श बाजूच्या गावांनी घेवुन तेथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यानी पुढाकार घेवून दारू बंदी करायला हवी..ग्राम स्वच्छता अभियानाचा गौरवाशाली ईतिहास आपण घडवलाच होता आता वेळ आलेली आहे ती या दारूबंदी आणि ईतर व्यसनांपासून आपल्या समाजाला स्वातंत्र्य करण्याची...कारण व्यसनमुक्त समाज हाच एखाद्या राष्ट्राला महासत्ता बनवू शकतो..

विचार तर कराल !

- तुमचाच
सर्वांच्याच स्वप्नातील समाज घडवू पाहणारा एक विवेकसाथी
हर्षल जाधव
9637351400

Posted on by हर्षल जाधव | No comments

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

"कॉम्रेड अविका सपना पुरा कौन करेगा ?"

कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा तरुण मुलगा अवी अचानक आणि धक्कदायक पद्धतीने मरण पावला . चळवळीत आलेला , दोन मुलांचा पिता असणारा व आणि स्वतःच्या वडिलांच्या कम्युनिस्ट चळवळीची धुरा पेलायला उभा राहिलेला अवी अचानक या जगातून नाहीसा झाला. कोल्हापूर मधीलच हजारो लोकांना हा धक्का अनावर , आरपार होता पण अविच्या अंतयात्रेत त्याला कॉम्रेड म्हणून पहिला लाल सलाम करून देणारे अवीचे वडील म्हणजेच कॉम्रेड पानसरेच होते .
"कॉम्रेड अविका सपना पुरा कौन करेगा ?" हा सवाल त्यांनी समस्त रडणार्या , आक्रोशात बुडलेल्या अक्षरशः दहा हजारापेक्षा जास्त संख्येने उपस्थित असणाऱ्या जनसमुदायाला विचारला , तेंव्हा जनसमुदायाकडून एकमुखाने आवाज आला "हम करेंगे हम करेंगे ".. ..

रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची...


आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची... 

मराठा मुख मोर्चा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन... 
या मोर्च्यात अनेक समाज घटकांनी आपला सहभाग, पाठींबा दर्शवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे..
यातीलव्ह एक संवेदनशील घटक म्हणजे पुरोगामी विचाराचे लोक.. हि लोकं तशी अल्पसंख्याकच...
शाहू फुले आंबेडकर जगणारी हि माणसे..
नुसते भाषणातच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात हि हि लोक कमालीची महामानवाचे विचार जगणारी हि लोक.. 
स्वातंत्र्य समता बंधुता हि तत्वे चिरंतन टिकावीत म्हणून सदैव प्रस्थापितांशी झुंज देणारी हि लोक
अंधश्रद्धा , जातीयता , कर्मकांड ,, अन्याय अत्याचार यांना सदैव विरोध करणारी हि लोक...
यांच्या या प्रवाहाच्या विरुद्ध घेऊन जाणाऱ्या विचारांमुळे हे नेहमीच बहुसंख्यांकांच्या रोषाचे धनी होत असतात
त्यात सध्या जातीच्या आधारेच मोर्चे निघत आहेत.. जाती अंताची स्वप्ने पाहणारा हा पुरोगामी वर्ग या मोर्च्या पासून स्वतःला कसा वेगळा ठेवू शकतो...
जात हीच अंधश्रद्धा असा म्हणणारा , नवविचारांची समाजात रुजवणूक करणारा हा वर्ग
या मोर्च्यातहि सामील होऊन हा मोर्चा यशस्वी पार पडावा म्हणून झटत असताना आपण सर्वानी पाहिला म्हणूनच
मित्रानो आता आपलीहि जबाबदारी वाढली आहे.. आपल्या या युद्धाच्या काळात हि लोक आपली तत्वे बाजूला सारून
आपल्यात सामील झाली. आता यापुढे आपणही याची साथ सोडायची नाही. शाहू फुले आंबेडकराचे
स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या या लोकांच्या विचारांना आपण आपल्या कृतीतून साथ द्यायची.. अंधश्रद्धा , भोंदूगिरी ,जातीयता ,धर्मांधता संपवन्यासाठी आपणही आता यांच्या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतले पाहिजे.. स्वतः पुरोगामी विचार जोपासून आपल्या घरामध्ये या विचारांचे अधिष्ठान निर्माण करून तसा संपूर्ण समाज घडविण्याच्या त्यांच्या या स्वप्नात आपण देखील सामील झाले पाहिजे..
दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आपली व्यवस्था अजूनही यशस्वी नाही झाली त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी शासनाला
मोर्च्या उपोषणाच्या माध्यमातून जाब विचारला पाहिजे.. ती आता आपलीही नैतिक जबाबदारी झाली पाहिजे..
आंतरजातीय विवाहाला आपणही प्रोत्साहन दिले पाहिजे.. प्रोत्साहन देता येत नसल्यास निदान विरोध तरी नको करायला..
कोणत्याही व्यक्तीच्या (तो कोणत्याही जाती व धर्माचा असो ) त्याच्या जीवन जगण्याच्या मूलभूत हक्काकवर गदा येणार नाही , त्याचे स्वातंत्र्य विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही यासाठी वैयक्तिक आपण प्रयत्न करायला हवेत.. तेंव्हाच आपल्या आजूबाजूचा समाज खर्या अर्थाने पुढारलेला असेल .. यासाठी इथून पुढील वाटचालीत आपन या पुरोगामी विचाराच्या मित्रांना आपली साथ नक्कीच देऊ ..
एकमेकांच्या साथीनेच स्वातंत्र्य समता बंधुता यांवर विश्वास ठेवणारा समाज आपण घडवू
आणि त्यातूनच उद्याचा भारत घडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे..
आपलाच परिवर्तनाच्या वाटेवरील एक मराठा
हर्षल जाधव
९६३७३५१४००

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

जर...तर

स्वच्छ व कडक ईस्त्रीचे कपड़े परिधान केलेले आमदार 
जर
त्यांच्या कपड्यांईतके स्वच्छ असते 
तर
या देशामधील गरीब व श्रीमंत यांतील 
अंतर नक्कीच कमी झाले असते.


सोमवार, ३ ऑक्टोबर, २०१६