रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची...


आता आपली पाळी... यांची साथ आता आपण नाही सोडायची... 

मराठा मुख मोर्चा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन... 
या मोर्च्यात अनेक समाज घटकांनी आपला सहभाग, पाठींबा दर्शवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे..
यातीलव्ह एक संवेदनशील घटक म्हणजे पुरोगामी विचाराचे लोक.. हि लोकं तशी अल्पसंख्याकच...
शाहू फुले आंबेडकर जगणारी हि माणसे..
नुसते भाषणातच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यात हि हि लोक कमालीची महामानवाचे विचार जगणारी हि लोक.. 
स्वातंत्र्य समता बंधुता हि तत्वे चिरंतन टिकावीत म्हणून सदैव प्रस्थापितांशी झुंज देणारी हि लोक
अंधश्रद्धा , जातीयता , कर्मकांड ,, अन्याय अत्याचार यांना सदैव विरोध करणारी हि लोक...
यांच्या या प्रवाहाच्या विरुद्ध घेऊन जाणाऱ्या विचारांमुळे हे नेहमीच बहुसंख्यांकांच्या रोषाचे धनी होत असतात
त्यात सध्या जातीच्या आधारेच मोर्चे निघत आहेत.. जाती अंताची स्वप्ने पाहणारा हा पुरोगामी वर्ग या मोर्च्या पासून स्वतःला कसा वेगळा ठेवू शकतो...
जात हीच अंधश्रद्धा असा म्हणणारा , नवविचारांची समाजात रुजवणूक करणारा हा वर्ग
या मोर्च्यातहि सामील होऊन हा मोर्चा यशस्वी पार पडावा म्हणून झटत असताना आपण सर्वानी पाहिला म्हणूनच
मित्रानो आता आपलीहि जबाबदारी वाढली आहे.. आपल्या या युद्धाच्या काळात हि लोक आपली तत्वे बाजूला सारून
आपल्यात सामील झाली. आता यापुढे आपणही याची साथ सोडायची नाही. शाहू फुले आंबेडकराचे
स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्या या लोकांच्या विचारांना आपण आपल्या कृतीतून साथ द्यायची.. अंधश्रद्धा , भोंदूगिरी ,जातीयता ,धर्मांधता संपवन्यासाठी आपणही आता यांच्या व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेतले पाहिजे.. स्वतः पुरोगामी विचार जोपासून आपल्या घरामध्ये या विचारांचे अधिष्ठान निर्माण करून तसा संपूर्ण समाज घडविण्याच्या त्यांच्या या स्वप्नात आपण देखील सामील झाले पाहिजे..
दाभोलकर पानसरे कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात आपली व्यवस्था अजूनही यशस्वी नाही झाली त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी शासनाला
मोर्च्या उपोषणाच्या माध्यमातून जाब विचारला पाहिजे.. ती आता आपलीही नैतिक जबाबदारी झाली पाहिजे..
आंतरजातीय विवाहाला आपणही प्रोत्साहन दिले पाहिजे.. प्रोत्साहन देता येत नसल्यास निदान विरोध तरी नको करायला..
कोणत्याही व्यक्तीच्या (तो कोणत्याही जाती व धर्माचा असो ) त्याच्या जीवन जगण्याच्या मूलभूत हक्काकवर गदा येणार नाही , त्याचे स्वातंत्र्य विचार करण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही यासाठी वैयक्तिक आपण प्रयत्न करायला हवेत.. तेंव्हाच आपल्या आजूबाजूचा समाज खर्या अर्थाने पुढारलेला असेल .. यासाठी इथून पुढील वाटचालीत आपन या पुरोगामी विचाराच्या मित्रांना आपली साथ नक्कीच देऊ ..
एकमेकांच्या साथीनेच स्वातंत्र्य समता बंधुता यांवर विश्वास ठेवणारा समाज आपण घडवू
आणि त्यातूनच उद्याचा भारत घडून येईल याची मला पूर्ण खात्री आहे..
आपलाच परिवर्तनाच्या वाटेवरील एक मराठा
हर्षल जाधव
९६३७३५१४००

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा